हरणांचा कळपाचा धुमाकूळ शेती पिकांची प्रचंड नासाडी..धनवाडी-गरताड भागात शेतकरी संकटात.. वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी

 

हरणांचा कळपाचा धुमाकूळ शेती पिकांची प्रचंड नासाडी..धनवाडी-गरताड भागात शेतकरी संकटात.. वनविभागाने लक्ष घालण्याची मागणी 


चोपडा दि.२०(प्रतिनिधी)तालुक्यातील धनवाडी गरताड शेतशिवारामध्ये जवळपास 20 ते 25 हरणांच्या कळपाने जोरदार धुमाकूळ घातला असून पिकांची प्रचंड नासाडी सुरू केली आहे .केळी पिकाची पाने व नवजात पिकाची पाने खात असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरी राजा समोर नवीनच  संकट उभे ठाकल्याने  डोक्याला हात लावावा लागला आहे. तरी संबंधित वन विभागाने तातडीने लक्ष घालून या हरणांच्या होणारा त्रास कसा टळेल याकडे लक्ष घातले पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

 धनवाडी - गरताड शिवारात २०/२५ हरिणांचा कळप सतत वर्षभर पिकांचं नुकसान करत आहेत.आता कापसाचे लहान कोंब , मका,केळीचे लहान रोपे व पेरणी झालेली इतर पिके खाऊन नुकसान करत आहेत.तरी वनविभागाने वेळीच उपाय योजना करून बळीराजाची या संकटापासून सुटका करावी. सलमान खान सारख्या अभिनेत्यालाही हरिण  व काळवीट या प्राण्याची शिकार चांगलीच महागात पडली असल्याने या हरणांकडे कोणी डोळे वटारून पाहण्यासही  धजावत नसल्याने त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.तरी वन विभागाने काही तरी मार्ग काढून शेतकऱ्यांचे होणाऱे नुकसान टाळण्यासाठी पाऊल उचलावेत अशी मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने