नरवाडे शेत शिवारात तडसाचा शेतकरी व बैलावर जीवघेणा हल्ला..वन विभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
चोपडा दि.१९(प्रतिनिधी)चोपडा तालुक्यातील नरवाडे शेत शिवारात तडस या वन्य प्राण्याने जोरदार धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यावर वबैल प्राण्यावर हल्ला चढवत जबर जखमी केल्याची घटना घडल्याने शेतकऱ्यांसह मंजुर वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी वन विभागाने तात्काळ दखल घेऊन तडसाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाडे येथील शेतकरी निंबा रमेश धनगर यांचे नरवाडे शेतशिवारात शेत आहे व ते आपल्या शेतात रात्री 9 वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी काढत होते त्यावेळी त्यांच्यावर तडस या वन्य प्राण्याने हल्ला केला निंबा धनगर हे ट्रॅक्टर वर असल्यामुळे त्यांनी तेथून पड काढत सुटका केली व घडलेली हकीकत गावातील लोकांना सांगितली.
दुसऱ्या दिवशीही तडसाचा हल्ला
नरवाडे येथील संदीप हिरामण धनगर हे याच शेताच्या बाजूला असलेले श्री दिनेश साहेबराव पाटील राहणार खरद यांच्या शेतात कोळपणी साठी गेले असता त्यांच्यावर त्या प्राण्याने हल्ला केला संदीप धनगर हे गाड्यावर चढल्यामुळे त्यांची सुटका झाली व त्यांनी त्यांना सोडून तिथे बांधलेल्या बैलावर हल्ला केला व बैलाला गंभीर जखमी केले.
नरवाडे अंबाडे शेत शिवारात शेतकऱ्यांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कामाला मजूर सुद्धा जात नाही त्यामुळे वनविभागाने सदरील वन्य प्राण्याला घेऊन जावे अशी मागणी जोर धरत आहे.