शाळेतील विद्यार्थ्यांनी गल्लोगल्ली दिला 'पाणी आडवा पाणी जिरवा' संदेश

 शाळेतील विद्यार्थ्यांनी गल्लोगल्ली दिला 'पाणी आडवा पाणी जिरवा' संदेश

अडावद ता. चोपडा दि.१९(प्रतिनिधी)येथे  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसभागीय सूक्ष्म नियोजनासाठी  प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी विद्यार्थ्यांनी 'पाणी आडवा पाणी जिरवा' अशा घोषणा देत प्रत्येक गल्लोगली जनजागृती केली.

      १९ रोजी सकाळी ८ वाजता ग्रामपंचायती पासून प्रभात फेरीस प्रारंभ झाला. यात गावातील सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत लोकसभागीय सूक्ष्म नियोजनासाठी चार टप्पे करण्यात आले आहे. मशाल फेरी, प्रभात फेरी, महिला ग्रामसभा व सर्वसाधारण विशेष ग्रामसभा यातून सर्व शेतकऱ्यांसाठी पोखरा योजनेतून काय लाभ होईल याबाबत माहिती देण्यात येणार असल्याने जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत संदेश जाण्यासाठी प्रभात फेरी ग्रामपंचायत पासून प्रारंभ झाला. महाराणाप्रताप रोड, शंभूभवानी चौक, पंचवृक्ष चौक, नेहरू चौक, महर्षि वाल्मीक चौक, दुर्गादेवीची चौक, सुभाष चौक, श्रीराम चौक, महात्मा फुले रोड, चांग्यानिम चौक परत ग्रामपंचायत अशी काढण्यात आली. यात प्रभात फेरीत शामराव येसो महाजन विद्यालय व सार्वजनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

    तसेच ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच बबनखा तडवी, सहायक कृषी अधिकारी किशोर महाजन, सहायक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी सेवक किरण गोसावी, प्रवीण सोनार, सदस्य सचिन महाजन, रवींद्र चव्हाण, संदीप महाजन, विकासो चेअरमन भूषण देशमुख, संजय देशमुख, साहेबराव धनगर, पि. डी. मगरे, वसंत धनगर, साहेबराव धनगर, चंद्रकांत महाजन, शा. ये. महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.के. पिंपरे, उपशिक्षक पि.आर.माळी, सार्वजनिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.जे.कदम, उपशिक्षक व्ही. एच. पानमन , एच.आर. कणखरे यांचा सहभाग होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने