ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा व वेदना मन गहिवरणाऱ्या : माजी आमदार चंद्रकांत सोनवणे.. जेष्ठ नागरिक संघाचा 32 वा वर्धापन दिन साजरा
चोपडा,दि.१३ (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा व वेदनांची आपणास जाण आहे काही दिवसानंतर आम्हाला देखील याच मार्गाने जायचे आहे पूर्वी जेष्ठ नागरिकांचा एकत्र कुटुंबात खूप सन्मान व्हायचा आता तो तसा राहिलेला नाही वृद्धाश्रम ही संकल्पना आल्यानंतर माझ्यासारखे ला वाटते की वृद्धाश्रम व्हायलाच नको असे प्रतिपादने माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी येथे केले .
चोपडा जेष्ठ नागरिक संघाच्या 32 व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमातमाजी आमदार सोनवणे पुढे म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करण्यासमी सदैव उत्सुक असतो मला त्यांच्याशी चर्चा करताना खूपबरे वाटते पुढे आपल्याकरिता जो निधी मंजूर केला होता तो देण्यास मी बांधीला आहे असेही त्यांनी यावेळी अध्यक्ष स्थानावरून
बोलताना सांगितले. आमदार लताताई सोनवणे ,माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराती, माजी नगरसेवक प्रकाश राजपूत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर हजर होते कार्यक्रम प्रारंभी दीपप्रज्वलन केल्यानंतर आमदार व माजी आमदार यांनीराष्ट्रमाता जिजाऊतसेच विवेकानंद यांच्यातील चित्रांना हार अर्पण के ला. चोपडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय करोडपती यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले गोपाल पाटील कैलास बाविस्कर शिवसेनेच्या तालुका अध्यक्ष मंगलाताई पाटील यांचे स्वागत शेतकरी संघाचे माजी संचालिका सौ देशमुख यांनी केला सौ शितल देवराज यांचे स्वागत श्रीमती शकुंतला बेन गुजराती यांनी केले या कार्यक्रमाला आधी ढोलेरा सिटी मेस्ट्रोडीया ग्रुप नवनिर्मिती संदर्भातलं चित्रण, राजेश जी गुप्ता गोवर्धनजी पाटीदार करण राजपूत यांनी उपस्थित ज्येष्ठांना दाखवले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.बी. महाजन यांनी केले या कार्यक्रमास ज्येष्ठ श्री एम. डब्ल्यू पाटील., नेरपगार, मधुकर साळुंखे , अनिल पालीवाल ज्येष्ठ पत्रकार व कवी रमेश जे पाटील, फोटोग्राफर छोटू वार्डे, आडगाव येथील चैत्राम महाजन ., जयंत कुलकर्णी, माजी सरपंच पंडित रामदास पाटील सतरा सेन ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश ठाकूर व मान्यवर सभासद यावेळी मोठ्या संख्येने हजर होते.
वर्धापन दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे सरचिटणीस प्रमोद डोंगरे, जयदेव देशमुख सौ. राधाताई देशमुख सौ डोंगरे, पंडितराव राजपूत, भारंबे काका, योगराज चौधरी, सोमनाथ लिंबाळे बारी, सर साहेबराव पाटील, एन .डी महाजन आदींनी परिश्रम घेतले .