पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन चोपडा नगरपरिषदेने राबविले पर्यावरण पुरक उपक्रम
चोपडा दि.५(प्रतिनिधी):प्रत्येक वर्षी 5 जुन जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांनी जाहीर केलेली थीम आहे – “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदुषणाचे निर्मूलन (Endilng Plastic Pollution Globally).” या पार्श्वभूमीवर, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC) यांनी 22 मे ते 5 जून 2025 या कालावधीत देशभरात जनजागृतीसाठी विशेष राबविण्याचे निर्देश दिले होते. तरी चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील यांच्या मार्गदशनाखाली दि.22/05/2025 ते दि.05/06/2025 दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केलेले होते. यामध्ये प्रामुख्याने श्रमदान मोहिम राबवून सुंदरगढी ते अरुन नगर नाला, समता नगर नाला तसेच विविध झोपडपट्टी परिसर, विविध शासकिय कार्यालय यांचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच शहरामध्ये विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे बॅनर लावुन जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धन, वसुंधरा वाचवा ह्या विषयावर कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. या विविध उपक्रमांच्या माध्यमातून एकल वापर प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करुन प्लास्टीक जप्तीकरण्याची कारवाई करण्यात आली होती. तसेच शहरामध्ये प्लास्टीक बंदीचा संदेश देवून नागरीकांना प्रोत्साहीत करण्यात आले.
तसेच दि.05/06/2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे अवचित्य साधुन नविन तहसिल कार्यालय जवळीत जुने अमरधाम च्या पाठीमागील परिसरात चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षरोपण मोहिम राबविण्यात आली. पुर्वी या परिसरामध्ये नागरीक वारंवार कचरा टाकत होते. यामुळे त्याठिकाणी जुन्याकचऱ्याचे ढिग जमा झाले होते. एकंदरीत हा पाँईट (GVP Point) म्हणुन ओळखला जावु लागला होता. परंतु विजय पालीवाल यांच्या तक्रारीवरुन मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील यांनी स्वच्छता विभागामार्फत सदर परिसराची स्वच्छता करण्याची निर्देश देवून 80 ते 100 ट्रॅक्टर ट्रिप कचरा वाहुन सदर परिसर अतिशय स्वच्छ केला आणि दि.05/06/2025 चे अवचित्य साधुन या परिसरामध्ये सुमारे 100 वृक्ष विजय पालीवाल यांच्या मार्फत पुरविण्यात येवून चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. राहुल पाटील व सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या श्रमदानातून वृक्षरोपण करण्यात आले. “यावेळी मुख्याधिकारी श्री.राहुल पाटील यांनी नागरीकांना जाहिर आवाहन केले की, शहरामध्ये निर्माण होणारा कचरा हा इतरत्र कुठेही न टाकता घंटागाडीतच टाकावा ज्यामुळे GVP Point ची निर्मिती होणार नाही. त्याचप्रमाणे नागरीकांनी नियमित काळजी घेतली पाहीजे की, आपली वसुंधरा कशी टिकेल किंवा तीची संवर्धन कशी करता येईल असे सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी सर्वानी झाडे लावावे व तेवढ्याच प्रेमाने त्याचे संवर्धन करावे तसेच जास्तीत जास्त कापडी पिशवी वापर करावा व प्लास्टीक बंदी प्रोत्साहित करावे.”
वरील कार्यक्रमास उपमुख्याधिकारी श्री.संजय मिसर, कर अधिक्षक श्री.संदिप गायकवाड, कर निरिक्षक श्री.प्रणव पाटील, मिळकत व्यवस्थापक श्री.संजय धमाळ, लेखापाल श्री.मयुर शर्मा, अंत.लेखापरिक्षक श्री.चेतन गडकर, श्री.मुकेश परदेशी, पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, विद्युत अभियंता श्री.मंगेश जंगले, स्वच्छता निरिक्षक श्रीमती दिपाली साळुंके, श्री.जयेश भोंगे, श्री.व्हि.के.पाटील, भांडारपाल श्री.महेश जोशी, सभाकामकाज लिपिक श्री.अनिल चौधरी, श्री.गणेश पाठक, शहर समन्वयक श्री.स्वप्निल धनगर तसेच स्वच्छता विभागाकडील सर्व मुकादम, मदतनीस, सफाई कामगार उपस्थित होते.