शरीर कितीही सुंदर असले तरी ते नाशिवंत आहे.-: ब्र. कु. शांताराम भाई पाटील
चोपडा दि.२०( प्रतिनिधी) शरीर कितीही सुंदर असले तरी ते नाशिवंत आहे आत्मा अमर आहे. म्हणून प्रत्येकाने मोहाचा त्याग केला पाहिजे, ग्र हस्ती योग सर्वात मोठा योग आहे. असे प्रतिपादन ज्ञानदान कार्यक्रमात ब्रह्माकुमार शांताराम भाई पाटील यांनी येथे केले.
चोपडा तालुक्यातील आडगाव येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखेत बाबा मिलन कार्यक्रमात बि.के. पाटील पुढे म्हणाले की, असुरी अवलाद, व ईश्वरी अवलाद यातील फरक अभ्यासातून कळून येतो? म्हणून ब्रह्मा बाबा म्हणतात मी तुमच्यासाठी पृथ्वीवर आलो आहे. आपण सर्व माझी प्रॉपर्टी आहात. मानवाने सुंदर शरीराचा गर्व करू नये? हे शरीर एक दिवस अग्नीत जळणारे आहे किंवा मातीत मिसळणारे आहे? परंतु यातील आत्मा अविनाशी आहे तो कधीही नाश पाहू शकत नाही! तारीख 20 रोजी दुपारी पाच वाजता ब्रह्माकुमारी दीदी व भाईंच्या उपस्थितीत शांताराम भाई पाटील यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा त गावातील प्रगती शील शेतकरी अंबादास नारायण पाटील, व महिला पोलीस पाटील, संगीता गोविंद पाटील यांना स् पत्नीक गौरवण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार व कवी लेखक तथा साहित्यिक , रमेश जे पाटील यांनी यावेळी आपले विचार मांडले. केंद्रातर्फे ब्रह्माकुमारीज जयश्री दीदी, चंद्रशेखर भाई, ईश्वर भाई पाटील, चोपडा येथून आलेले भाई राजेंद्र पाटील , माणिकचंद पाटील यांनी उपस्थित बीके परिवारातील सदस्यांचा सत्कार केला. दुबई येथून खास करून या कार्यक्रमाला आलेले राहुल अंबादास पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.