दिव्यांगांचे मानधन वेळेवर देण्यासाठी जयवंतराव पाटील यांना आवाज उठविण्याचे साकडे

 दिव्यांगांचे मानधन वेळेवर देण्यासाठी जयवंतराव पाटील यांना आवाज उठविण्याचे साकडे

चोपडा दि.२२(प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील हे चोपडा दौऱ्यावर आलेले असतांना त्यांच्या  गाडीला  हातेड बसस्थानका जवळ गावकऱ्यांनी हात देऊन थांबवून विविध समस्यांबाबत रस्त्यावरच चर्चा केली .यावेळी दिव्यांग बांधव महेंद्र सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून  दिव्यांग बांधवांचे तीन महिन्यापासूनचे मानधन  बंद असल्याचे ग्राहणे मांडून आवाज  उठवावा अशी मागणी केली .

राज्यभर मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचे पैसे जलद गतीने खात्यावर पडून राहिलेत मात्र दिव्यांग बांधव ,वृद्ध ,निराधार या लोकांचे मानधन थांबवण्यात आले आहे. ते खात्यावर जमा होत नसल्याने अनेक जण अडचणीत आले आहेत असे सांगून  नामदार जयंतराव पाटील यांनी पुढाकार घेऊन  न्याय द्यावा अशी मागणी केली . यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने