बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात आषाढ मासारंभानिमित्त बरसल्या 'पाऊस शब्दधारा '

 बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात आषाढ मासारंभानिमित्त बरसल्या 'पाऊस शब्दधारा '

चोपडा, दि.७ (प्रतिनिधी)आषाढस्य प्रथम दिवसे अर्थात कविकुलगुरु कालिदासांच्या स्मरणा निमित्त अमर संस्था संचलित बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयात नामवंत कवींच्या पाऊस विषयावरील संकलित कवितांचा पावसाची विविध रुपे उलगडणारा 'पाऊस शब्दधारा ' हा कार्यक्रम विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी सादर केला . यात कवयित्री शांता शेळके, मंगेश पाडगांवकर, बहिणाबाई चौधरी, ना . धों. महानोर, कवी सौमित्र, कवी नलेश पाटील, अरुण म्हात्रे , अशोक बागवे यांच्या मुक्त छंदातील तसेच गेय कवितां मधून  विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी कवी प्रतिभा व संजीवक पाऊस यांच्या चैतन्याने नटलेल्या निसर्गाची व पावसाची रुपे विद्यार्थ्यासमोर जिवंत करतांना 'पाऊस शब्दधारां ' मधून त्यांना चिंब भिजवले .या प्रसंगी बालमोहन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ . प्रीती सरवैय्या -पाटील मॅडम, प्रा . तुषार पाटील, दिलीप सूर्यवंशी इ . ची उपस्थिती होती .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने