अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी संपूनही भाऊबीज भेटेना!! महिला कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष..!!आय टक तर्फे उपोषणाचा इशारा

 




अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळी संपूनही भाऊबीज भेटेना!! महिला कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष..!!आय टक तर्फे उपोषणाचा इशारा 

चोपडा दि.२९(प्रतिनिधी) जळगाव.. महाराष्ट्र राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यावर्षी सालाबाद प्रमाणे दिपवाळीला दोन हजार रुपये भाऊबीज जाहीर केली व याप्रमाणे जळगाव जिल्हा परिषद व इतर जिल्हा परिषद यांना रखमा पाठवलेले आहे परंतु जळगाव जिल्हा परिषदेमार्फत अद्याप पावेतो जिल्ह्यातील चोपडा, जामनेर ,धरणगाव ,यावल आदी तालुक्यांना अंगणवाडी सेविकांना मदतनिसांना भाऊबीज दिवाळी संपून वीस-बावीस दिवस झालेत तरीपण दिलेली नाही. राज्य सरकारने पैसे दिलेले असताना जळगाव जिल्हा परिषदेने महिला कर्मचारीना दिवाळी संपून २०/२५दिवस झाले. पण अद्याप पावेतो भाऊबीजेचे रकमेपासून वंचित ठेवायचे कारण काय? याबाबत या महिला कर्मचाऱ्यंना मध्ये असंतोष पसरला आहे .अंगणवाडी  कर्मचाऱ्यांना दोन दिवसाच्या आत न दिल्यास जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जळगाव जिल्हा परिषदेसमोर  कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक उपोषण आंदोलन करणार आहे. असा इशारा जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आय टक तर्फे जिल्हाध्यक्ष अमृत महाजन प्रेमलता पाटील ममता महाजन, सुमित्रा बोरसे, अनिता बोरसे, उषा कोळी, फरिन , शारदा पाटील, नंदा वाणी ,वत्सला पाटील गूप्त्यारी तडवी अश्विनी देशमुख यांनी दिला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने