*शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चिमठाणे सरपंच खंडु भिल यांच्या वर खोटे गुन्हा मागे घेण्यासाठी निदर्शने व निवेदन.*



शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात चिमठाणे सरपंच खंडु भिल यांच्या वर खोटे गुन्हा मागे घेण्यासाठी निदर्शने व निवेदन.*          

 शिंदखेडा दि.०२(तालुका प्रतिनिधी यादवराव  सावंत): - येथील भिल समाज विकास मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिमठाणे येथील भिल समाजातील सरपंच खंडु वंजी भिल ह्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्याची लोकप्रियता काही उच्चभ्रू समाजात खटकत आहे.म्हणुन खोटे आरोप लावुन त्यांना हया प्रकरणात दोषी ठरवून त्रास दिला जातो आहे.जिल्हाधिकारी ह्यांनी सदर प्रकरणास लक्ष वेधून समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.त्यानंतर निवेदन देण्यात आले.निवेदन देण्यासाठी पत्रकार यांना मज्जाव करण्यात आला.सदर सदर प्रकरणास न्याय न मिळाल्यास राज्यपाल यांच्या कडे धाव घेतली जाईल असे भिल समाज विकास मंचच्या संस्थापक अध्यक्ष दिपक अहिरे यांनी सांगितले.हयावेळी खानदेशातील मोठ्या प्रमाणात समाज महिला व बांधव उपस्थित होते.हयावेळी एकलव्य संघटना यांनी देखील पाठिंबा दिला.प्रसंगी चंद्रकांत सोनवणे.शामा ठाकरे.मन्साराम मालचे, राजेश मालचे,छोटु मोरे ,बापु देवरे, रवींद्र वाघ, यमुना भिल,अनुबाई भिल,अरुणा मारणे सुरेश भिल, नवल सिंग मालचे, एकलव्य संघटनेचे दिपक मोरे अँड.सजन वाघ यांच्या सह शोकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने