स्वातंत्र्य दिना निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान

 

स्वातंत्र्य दिना निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान

चोपडा दि.१७(प्रतिनिधी)भारत राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा कार्यकर्त्यांमार्फत  कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत अन्नदानाचा कार्यक्रम संपन्न झाला.
भारत राष्ट्र समितीच्या जळगाव जिल्हा महिलाआघाडी अध्यक्ष कोमल ताई पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख समाधान बाविस्कर व वर्षा चौधरी  यांच्या प्रयत्नातून हा समाजोपयोगी कार्यक्रम पार पडला. यावेळी संस्थे मार्फत आयोजकांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने