चोपडा शहरातील खराब रस्ते दुरुस्त करा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
चोपडा दि.२१(चोपडा प्रतिनिधी).. शहरात भुयारी गटारींचे काम जोरात सुरू असून त्यामुळे उखडलेले रस्त्यांची बिकट अवस्था झाली आहे .तरि खराब झालेले रस्ते नगरपालिकेने ताबडतोब दुरुस्त करावेत अशी मागणी भाकप तर्फे करण्यात आली आहे.
शहरातील महात्मा फुले नगर ते ग्रामीण पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोल मंदिर ते आशा टाकीज चौक तसेच थालनेर दरवाजा ते जुनी तहसील कचेरी परिसरातील रोडचे गटारी व इतर काम केल्यामुळे रस्त्याचे डांबर उखडले असून रस्ते ओबड ढोबळ झाले आहेत त्यात पावसामुळे तर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावरून जाताना दुचाकी वा चार चाकी वाहनांना अक्षरशा तारे वरची कसरत करावी लागत आहे. खराब रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी नगरपालिका मुख्याधिकारी यांना केली आहे
या निवेदनावर भाकप नेते अमृत महाजन , संजय पाटील ,महेंद्र माळी, विजय माळी, विनोद बडगुजर, डी वि भाट, सोनू माळी, प्रशांत पाटील ,संदीप पाटील, प्रभाकर पाटील, चेतन पाटील, यशवंत बारी ,दीपक पाटील, रमेश माळी, धोंडू माळी, महेंद्र महाजन आदींच्या सह्या आहेत