निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण लवकर पुर्ण करा...!राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांची मागणी

 निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण लवकर पुर्ण करा...!राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांची मागणी


चोपडा दि.०५(प्रतिनिधी): कित्येक वर्षापासून  *निन्म तापी प्रकल्प,पाडळसरे (धरण) ता. अमळनेर जिल्हा. जळगाव* या प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे. तरी या धरणावर शेतकरी पुत्र तथा जळगाव जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस उर्वेश साळुंखे यांनी दि. ४ रोजी धरणाची पाहणी केली. पाहणी करून असे आढळले कि धरणाचे काम खूप अपूर्ण आहे. हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी  *केंद्र सरकार व राज्य सरकार* यांना विनंती करत आहे.  या प्रकल्पाला *परिपूर्ण निधी* देऊन हा *प्रकल्प पूर्ण करावा अशी  विनंती केंद्र सरकार व राज्य सरकार यांना करत आहे. तथा जळगाव जिल्ह्यातील सर्व  खासदार आमदार तथा पुढारी यांना विनंती करतो की सदरील प्रकल्पाकडे परिपूर्ण लक्ष द्यावे*. 

      हा प्रकल्प पूर्ण झाला की अमळनेर चोपडा, पारोळा ,धरणगाव, एरंडोल,इ. या तालुक्यांच्या जबरदस्त *सिंचनाचा फायदा शेतकरी राजाला होईल*. आणि कित्येक गावांना या धरणाचा फायदा होईल. तरी खास करून *केंद्र सरकारने जर लक्ष दिले.* तर हा प्रकल्प *लवकरच पूर्ण होईल* अशी अपेक्षा उर्वेश साळुंखे  यांनी केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने