माय माती रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणारे वीर जवानांच्या शौर्यास मानाचे नमन .. एक दिवा पेटवून २६ रोजी आदरांजलीचा देशभक्तीमय कार्यक्रम.. उत्कृष्ट संकल्पना गटनेते जीवनभाऊ चौधरी यांची
चोपडा दि.२५(प्रतिनिधी): २६/११ रोजी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक संध्याकाळ देशाची सीमेपासून ते आंतरिक सुरक्षेसाठी स्वत च्या जिवाची आहुती देणार्या वीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चोपडा तालुक्यातील सर्व देशभक्त नागरिकांनी सहभागी होऊन देश हितासाठी शाहिद झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रोत्साहित करुन धीर देण्याचे मौलिक काम करावे.ही उत्कृष्ट संकल्पना न.पा.गटनेते श्री जीवनभाऊ चौधरी* यांनी मांडली असून प्रचंड संख्येने या स्तूत्य उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे
दिनांक२६ नोव्हेंबर २०२१ रोजी चोपडा येथील कारगिल चौक येथे संध्याकाळी ५:०० वाचता हजारोंच्या संख्येने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तसेच सर्व देशभक्त नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी नोंदणी केल्यास नि:शुल्क दिवे व समूहाने नोंदणी केल्यास मशालीची व्यवस्था करण्यात येईल तसेच कोविड १९ चे सर्व नियम पाळून व पांढरे कपडे घालून सामाजिक सलोखा राखत शिस्तीने आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहावे.असे आवाहनही श्री जीवनभाऊ चौधरी* यांनी केले आहे