रेशनधान्य लाभार्थींन्यो घाबरून जाऊ नका..! अजूनही मिळेल रेशन मोफत मार्च 2022 पर्यंत ..* *खा. बाळू धानोरकर यांच्या पत्राची पंतप्रधान यांनी घेतली तात्काळ दखल*


 


रेशनधान्य लाभार्थींन्यो घाबरून जाऊ नका..! अजूनही  मिळेल रेशन मोफत   मार्च 2022 पर्यंत ..*
*खा. बाळू धानोरकर यांच्या पत्राची पंतप्रधान यांनी घेतली तात्काळ दखल*
मुंबई  वृत्तसंस्था दि.२७
वणी कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातल्याने भारतातील सामान्य नागरिकांचे अन्नधान्याअभावी हाल होऊ नये, सर्वांना पोटभर जेवण मिळावे म्हणून देशात कल्याण योजना लागू केली गेली. या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतात 80 कोटी रेशन कार्डधारकांना सध्या मोफत अन्नधान्य वाटप सुरू आहे. मात्र कोरोनाची घटती संख्या व अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे केंद्र सरकारने ही योजना येत्या 30 नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानंतर खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या योजनेला 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत मोदी सरकारने मार्च 2022 पर्यंत ही योजना सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरली तरी पूर्णपणे बंद झाली नाही. दोन वर्षे कोरोनाने होरपळलेल्या अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यांची स्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. अशा स्थितीत ही योजना बंद करणे गरीब जनतेवर अन्यायकारक असून मुदतवाढ देच्याची गरज खा. बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रातून व्यक्त केली होती

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने