*कन्नड घाटात दरड कोसळल्याने शेकडो वाहने अडवून पडली..झाडे झुडपेही कोलमडून पडल्याने वाहनधारकांची उडाली भंबेरी.. जेसीबीच्या सहाय्याने पहाटेपासूनच मदतकार्य सुरू..पोलिस करतायं भर पावसात तारेवरची कसरत* ..
चाळीसगाव दि.३१(प्रतिनिधी) :संततधार पावसामुळे कन्नड घाटात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्याने अनेक तासांपासून वाहतूकठप्प झाली आहे. तातडीने रस्ता मोकळा करण्याचे कामप्रशासनाने सुरू केले असून वाहनधारकांनी आता नांदगावमार्गाने औरंगाबादकडे वाहतूक वळवली आहे.
मोठ्या प्रमाणात वाहतूकअसलेल्या कन्नड घाटात रात्रीच्या सुमारास दरडी कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून यामुळे दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरूकेले. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता मोकळा करण्यातअनेक अडचणी आल्या. महामार्ग सुरक्षा पथकाचे उपनिरिक्षक भागवत पाटील हे सहकार्यांसह घटनास्थळीअसून महामार्ग मोकळा करण्यासाठी मदत करत आहेत..
सकाळीच युद्ध पातळीवर कामाला सुरूवात पहाटेपासून जेसीबीच्या मदतीने कोसळलेल्या दरडीचाढिगारा बाजूला करण्याचे काम युध्द पातळीवरून सुरू झाले असून लवकरच मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.मात्र तूर्तास तरी कन्नड घाटातून प्रवास करण्याचे टाळावे,असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. कुणाला औरंगाबाद येथे जावयाचे असल्यास नांदगाव मार्गे व जळगावमार्गे रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यातआले आहे.
दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे देखिल उन्मळून पडली असून सर्वत्र दगडांचा खच व चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतुक खोळंबली आहे. कन्नड औरंगाबादकडे तसेच चाळीसगाव शहराकडे सुमारे आठ ते दहा कि.मी. अंतरापर्यत वाहने खोळंबली आहेत.