प्रदीप माळी हत्याप्रकरणी समाज बांधवांचा मूक मोर्चा.. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.. शहर पोलिस निरीक्षकांना निवेदन
चोपडा दि.२१(प्रतिनिधी)चोपडा शहरातील नारायणवाडी परिसरात धरणगाव नाकाजवळ झालेल्या प्रदीप राजू माळी यांच्या खून प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे व मयताच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी विविध संघटनांनी व समाजबांधवांनी शहर पोलीस स्टेशनवर सकाळी भव्य मोर्चा काढत पोलीस अधीक्षक पवन कुमार देसले यांना तशा आशयाचे निवेदन दिले आहे.
यावेळी माळी समाज पंच मंडळ व समाज बांधव तसेच नारायण माळी ,पुडलिक महाजन, दगडू महाजन, शालीक महाजन, रमेश महाजन ,समाधान महाजन, महेंद्र धनगर ,महेंद्र महाजन, रुपेश महाजन, प्रविण महाजन, लक्ष्मण महाजन, दौलत महाजन,सी.बी. माळी, दगडू माळी ,नामदेव माळी, छगन माळी, दीपक माळी, बापू माळी ,नवल माळी, रमेश माळी, कैलास माळी ,समाधान माळी, महेंद्र माळी, राजेंद्र माळी, राजेंद्र प्रकाश माळी, संतोष माळी, कैलास माळी ,ज्ञानेश्वर माळी, संतोष माळी, समाधान माळी लक्ष्मण माळी ,मोतीलाल माळी, मधुकर माळी,लोटन महाजन साहेबराव महाजन, रोहित माळी, सुनील माळी ,दीपक महाजन, अशोक माळी ,रमेश माळी ,किशोर देशमुख, हरीश माळी , भैया माळी, दौलत महाजन ,योगेश धनगर, रवींद्र माळी यांच्यासह समाजबांधव,स्नेही जन व नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
