आरटीओ कडून होणारी पिळवणूक थांबवावी म्हणून तहसीलदारांची भेट
चोपडा,दि.३०(प्रतिनिधी):-चोपडा तालुक्यात "आरटीओ" नाव असलेली गाडी दररोज घिरट्या मारत असून वाहन चालकांकडून माया जमविण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचे ऐकीवात आले आहे.अनेक अवजड वाहन चालक त्यामुळे मेटाकुटीस आले असल्याने दबक्या आवाजात माहिती देत आहेत.तरी या गंभीर प्रकाराची दखल घेऊन तहसीलदार साहेबांनी एक पाऊल पुढे टाकत हा प्रकार थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अमृतराव सचदेव यांनी तसेच कार्यालय गाठून तहसीलदार कडे केली आहे.
चोपडा तालुका हा आदिवासी बहूल तालुका असून शेजारीच मध्यप्रदेशाची सीमा आहे त्यामुळे मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जनतेला व्यापारासाठी चोपडा शहर हे मध्यभागी व जवळ असल्याने नागरिकांना सोयीस्कर होते. पण येणाऱ्या जाणाऱ्या गोरगरीब जनतेकडून व हेवी वाहनांना थांबवुन आरटीओ पोलिसांची गाडी नेहमी रस्त्यावर दिसते.मोठ्या ट्रक्स, खाजगी छोट्या मोठ्या गाड्या नेहमी चेकिंग करण्याच्या बहाण्याने आरटीओ पोलीस पथक दिसते,विनाकारण गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्याचे प्रकार पोलिसांचे सुरू आहेत,म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपजिल्हाध्यक्ष अमृतराज सचदेव यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना भेटून सविस्तर चर्चा करून असे प्रकार थांबवावे म्हणून सांगितले. त्यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सनी सचदेव,व पत्रकार मिलिंद सोनवणे उपस्थित होते.