आईजवळ झोपलेल्या २ वर्षाच्या मुलीचा बिबट्याने पाडला फडशा.. अर्ध्या रात्रीला कुटूंबियांचा आसमंतात आक्रोश

 आईजवळ झोपलेल्या २ वर्षाच्या मुलीचा बिबट्याने  पाडला फडशा.. अर्ध्या रात्रीला कुटूंबियांचा आसमंतात आक्रोश


♦️ दोन महिन्यांत दोन बालकांचा मृत्यू झाल्याने आ.चंद्रकांत सोनवणे यांचा  शिवसेना स्टाईलने वन अधिकाऱ्यांवर संताप.. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सुनावले खडे बोल.. मुख्यमंत्री निधीतून भरीव मदतीचे आश्वासन

 यावल,दि.17(प्रतिनिधी)यावल वनपरिक्षेत्र पश्चिम भागात गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी  बिबट्याने एका बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली ना घडली तोवर  डांभूर्णी शिवारात आज पुन्हा एका दोन वर्षाच्या लहान मुलीला उचलून नेऊन तिचे लचके तोडून ठार केल्याची  ह्रदयद्रावक घटना घडली.या घटनेने शेतकरी वर्गासह इतर सर्व क्षेत्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .मयत मुलींचे नाव रत्ना बाई  असून वय अवघे दोन वर्षे आहे.विशेष म्हणजे ती तिच्या आईजवळ झोपलेली असताना बिबट्याने डाव साधल्याने परिसरात प्रचंड घबराट उडाली आहे.दरम्यान पश्चिम वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये निष्क्रिय ठरत असल्याने आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी तिख्या शब्दात खडे बोल सुनावलेआहेत.तसेच वरिष्ठ पातळीवर आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

घटनेची अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील शेत शिवारात गट क्र. ७४१ मध्ये मेंढपाळांचे ३ कुटुंब गेल्या ५ दिवसापासून  प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मुक्कामी होते. गुरुवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास बिबट्याने या कुटुंबातील "रत्नाबाई "या  २ वर्षाच्या चिमुकलीला, मुलीला तिच्या आईच्या कुशीतून म्हणजे आईजवळ झोपलेली असताना  बिबट्याने उचलून नेऊन केळीच्या बागेत घेऊन गेला आणि तिथे त्याने त्या लहान बालिकेचे लचके तोडत ठार मारून  फस्त केले.कुटुंबीयांनी आरडाओरडा केली असली तरी रात्रीची वेळ असल्याने बिबट्या लागलीच पळून गेला.

दरम्यान,या दुर्घटनेची माहिती मिळताच यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर,पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.आधीच दिवसा वीज नसल्याने रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शिवारात जावे लागते.यातचबिबट्याची परिसरात दहशत असल्याने शेतात शेतमजूर काम करण्यासाठी नकार देत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला असून संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे. 

या संतापजनक घटनेची माहिती मिळतात आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबियांची भेट घेऊन तीव्र दुःख व्यक्त करीत सांत्वन केले. निष्क्रिय अशा वन अधिकाऱ्यांना आपल्या शिवसेना स्टाईलने चांगलेच धारेवर धरले आणि बिबट्याला तातडीने पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले . तसेच घटनास्थळावरूनच जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत  माहिती अवगत करून दिली. त्याचप्रमाणे आपदग्रस्त कुटुंबीयांना म्हणजेच मयताच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून आपण भरीव निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन देऊन वनविभागाने त्वरित प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक वनसंरक्षक जमीर शेख ,यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, सूर्यभान सर पाटील  यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या  उपस्थित होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने