चोपडा बसस्थानकांमध्ये चोरी; जालना येथील पीएसआय प्रल्हाद पिराजी मान्टे चा सहभाग
चोपड़ा,दि.१७ (प्रतिनिधि )--- चोपडा पोलिसांनी बुधवारी चोरटयानी बस स्थानकावर चोरी केल्यानंतर पळ काढला होता.मात्र पोलिसांनी पाठलाग करून ह्या चोरटयाना पकडले. बुधवारी चोपडा बसस्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे ३५ हजार रूपये बसस्थानकातून चोरी झाले. पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती अगोदरच मिळून गेल्याने त्यांनी चोरटयावरपाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार (क्र एम एच-४३ एन-२९२८ व) या कारचा पाठलाग केला. चोपडा धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली. त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मान्टे (वय-५७, रा., सदर बाजार जालना), श्रीकांत भिमराव बघे (वय-२७ रा.गोपालनगर खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (४३ रा. माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला,) ,रउफ अहमद शेख (४८रा महाळस तालुका जिल्हा बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल २७ गुन्हे दाखल आहेत. तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे. चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे पीएसआय जितेंद्र वाल्टे, एकनाथ भिसे व पोलिस कर्मचारी रितेश चौधरी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे,दीपक माळी, रवींद्र पाटील,पोलिस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वाल्टे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. याबाबत शहरात एकच चर्चा आहे की, पोलिस उपनिरीक्षकच चोर आहे तर मग सामान्य माणूसाने न्याय मागायचा तरी कोनाकडे? असा सवाल प्रत्येकाचा मनात येत आहे.