आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे आदिवासींसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल..

 आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांचे आदिवासींसाठी  एक महत्त्वपूर्ण पाऊल..

♦️ भन्नाट विकासाठी  जिल्हाधिकारी,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी,वन अधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांची जम्बो बैठक संपन्न 

जळगाव दि.५(प्रतिनिधी) : चोपडा तालुक्याचे भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार प्रा. श्री चंद्रकांत सोनवणे  यांच्या प्रमुख  उपस्थितीत धरती आबा  जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांचे सादरीकरण  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद  व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित , प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या सोबत बैठक होऊन करण्यात आले.या योजनांमुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी  चालना मिळून आदिवासीं समाजाच्या भवितव्यासाठी  एक महत्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.  आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी विविध योजनांची सादरीकरण केली, ज्यामध्ये CFR Management Plan चा खास समावेश होता.

आदिवासी बांधवांच्या उध्दारासाठी एकत्र येऊन काम करण्याचा हा एक उत्तम मार्ग असून त्यामुळे आदिवासींना सक्षमतेसाठी फलदायी ठरेल असा विश्वास  आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.बैठकीत त्यांनी  विविध प्रमुख विषयावर  प्रकाशझोत टाकून प्रशासनाने जोमाने काम करण्याचा आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी तालुक्यातील प्रलंबित असलेले वाडी वस्ती पाडे पेसा अधिनियम पेसा गावाच्या दर्जा देऊन पाड्यांना पेसा अबंध निधी द्यावा,आदिवासी भागांना सर्व जल स्तोत्राची बळकटी करून पाणी पातळी वाढवावी,प्रलंबित वनदावे बाबत जिल्हाधिकारी मार्फत लवकर प्रकरण निकाली काढावेत,मंजूर असलेले वनगावी यांना पी एम किसान योजनेच्या लाभ देण्यात यावा,आदिवासी भागातील गाव पाडे यांना महसूल गाव घोषित करावे,पेसा गावांना अंगणवाडी व मिनी अंगणवाडी सुरू करण्यात यावी,आदिवासी पेसा गावांना गावठाण प्रस्ताव मंजूर करून देण्यात यावा,आदिवासी पाड्यांवरील घरकुल योजना पात्र लाभार्थी यांना त्यांचे भौतिक क्षेत्रातील नदी मधून रेती सहज उपलब्ध करून देण्यात यावी,पेसा गाव पाडे यांना जोडणारे सर्व रस्ते तयार करून देण्यात यावे आदि विविध समस्यांचे निराकरण  करावे असे सांगितले.तसेच धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम अभियान योजना व आदिवासी विभाग विविध योजना सादरीकरणात धरती आबा जना जाती है उन्नत ग्राम अभियान योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी,या योजनेत जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातून 112 गावांचा समावेश आहे, त्यामुळे आदिवासी समाज ज्या गावात किमान 500पेक्षा जास्त किंवा 50% पेक्षा जास्त लोकसंख्या वास्तव्याला  आहेत अशा प्रत्येक  गावाचा व त्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबे व लाभार्थ्यांच्या  सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातुन लाभ देण्याबाबतची कार्यवाही ही नियोजनबद्ध रित्या पुढील पाच वर्षात शासकीय विभागांमार्फत हे सर्व लाभ देण्यात यावेत असे सांगितले.

यावेळी सामुहिक वनहक्क मंजुर झालेले अशा २०५ गावांपैकी केंद्र शासनाच्या निदर्शनानुसार प्राथमिक स्वरूपात अनुसूचित क्षेत्रातील वीस गावांचे सामुहिक  वनहक्क गावांचे (CFR Management Plan) आराखडे तयार केलेबाबत श्री. हडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा यांनी सादरीकरण केले. 

  याप्रसंगी  जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे , प्रकल्प अधिकारी अरुण पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अकलाडे , सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपले ,श्री. अजय पाटील,प्रा. प्रशांत सोनवणे क. ब. चौ.उ. म. वि. जळगाव ,प्रशांत माहुरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी यावल आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने