महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधूमाशापालन योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित

 महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग 

मंडळामार्फत 

मधूमाशापालन योजना संपूर्ण राज्यात

 कार्यान्वित 

       

  जळगाव दि. 17 ( प्रतिनिधी )  -   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना  (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. याकरीता पात्र व्यक्ती / संस्थाकडून खालील दर्शविल्याप्रमाणे अर्ज मागावण्यात येत आहे.

            अ) योजनेची वैशिष्टे  - मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के लाभार्थी स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती

ब) योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता

१) वैयक्तिक मधपाळ- पात्रता - अर्जदार साक्षर असावा, स्वताची शेती असल्यास प्राधान्य, वय १८ वर्षापेक्षा जास्त         २) केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ -व्यक्ति पात्रता-  किमान १० वी पास, वय वर्ष २१ पेक्षा जास्त, असा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याहि व्यक्तीच्या नांवे किमान १ एकर शेती जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन, प्रजनन वः मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

३) केंद्रचालक संस्था पात्रता - संस्था नंदणीकृत असावी, संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घतलली किमान १००० चौ. फुट सुयोग्य इमारत असावी, संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकाना प्रशिक्षण देण्यांची क्षमता असलेले सेवा असावीत, 

४) आग्या मध संकलन प्रशिक्षण व संच किट वाटप पात्रता  - पारंपारिक कारागिर असावा, ५ व्यक्तीचा १ समूह, वय १८ वर्षापेक्षा जास्त व लिहिता वाचता-येणारा असावा, ५) विशेष छंद प्रशिक्षण - शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, कार्यरत सेवानिवृत्त कर्मचारी, व इतर सर्व

क) अटी व शर्ती - लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणांपूर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र व इत्तर पुर्तता पूर्ण करून देणे अनिवार्य राहील, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी केंद्रचालक- २० दिवस निवासो प्रशिक्षण महाबळेश्वर येथे व मधपाळ निवासी प्रशिक्षण १० दिवस जिल्हास्तरावर घेणे अनिवार्य राहील, आग्या मध संकलन व विशेष/ छंद प्रशिक्षण निवासी ५ दिवस जिल्हास्तरावर घेणे बंधनकारक असेल, अधिक माहितीसाठी संपर्क -  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, आय टी आय जळगांव, दुरध्वनी क्र. ०२५७ २२५२९७१, श्री. सुरवाडे मोबा. ९६२३५७८७४० २) संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामाद्योग मंडळ, शासकीय वंगला नं. ५. मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा ४१२८०६, दूरध्वनी-०२१६८- २६०२६४ जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, राजेंद्र  चव्हाण, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने