प्रस्तावित वनपट्टे धारकांना नियमानुसार वनपट्टे मंजूर करा : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या

प्रस्तावित वनपट्टे धारकांना नियमानुसार वनपट्टे मंजूर करा : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या 

♦️वैजापूर जनसंवाद मेळाव्यात आदिवासींच्या विविध समस्यांवर चर्चा 



चोपडा दि.१२(प्रतिनिधी) :आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी वैजापूर तालुका चोपडा या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत राष्ट्रीय अनुसूचित जनजमाती आयोगाचे अध्यक्ष  अंतरसिंग आर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद मेळावा संपन्न झाला.सदर मेळाव्याच्या प्रसंगी राजीवजी सक्सेना निजी सचिव राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, अंकितकुमार सेन अनुसंधान अधिकारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग,गोवर्धनजी मुंडे वरिष्ठ अन्वेषक राष्ट्रीय जनजाती आयोग  अमृतलालजी प्रजापती सल्लाहाकार राष्ट्रीय जनजाती आयोग,जमीरजी शेख उपवनसंरक्षक वनविभाग यावल,वेवोतोल केजो मॅडम सहाय्यक जिल्हाधिकारी जळगाव अरुणजी पवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल, प्रथमेश हडपे सब डीएफओ चोपडा तसेच पंचायत समिती,महसूल विभाग,पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी वर्ग आदी मान्यवरांच्या उपस्थित होते .  

जनसंवाद मेळाव्यात आदिवासी बांधवांनी आपले प्रश्न आदिवासी जनजाती आयोग अध्यक्ष अंतरसिंगजी आर्य व समिती सदस्य यांच्यासमोर मांडले सदर प्रसंगी वनपट्टे धारकांच्या अडचणी,जातीचे दाखले काढण्यासंदर्भातील अडचणी, आरोग्य सुविधा,पेसा भरती संबंधित अडचणी तसेच आदिवासी भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही याविषयी अशा अनेक प्रश्न आदिवासी बांधवांनी जनसंवाद मेळाव्यात मांडले .सदर प्रसंगी आदिवासी जनजाती आयोगाचे अध्यक्षअंतरसिंगजी आर्य यांनी सर्व आदिवासी बांधवाच्या प्रश्न जाणून घेतले. प्रस्तावित वनपट्टे धारकांना नियमानुसार वनपट्टे मंजूर करणेबाबत आदेशित केले,पेसा भरती संदर्भात राष्ट्रीय आदिवासी जनजाती आयोग पूर्णपणे तुमच्या सोबत आहे असे आश्वाशित केले.तसेच आदिवासी क्षेत्रात मोबाईल नेटवर्क संदर्भात अधिकारी यांच्या सोबत मिटींग घेऊन समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, तसेच अनेर नदीवर मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांच्या सीमेवर धरण बांधकाम प्रस्तावित असून यामुळे दोन्ही राज्यातील आदिवासी बांधवाचा शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच आदिवासी विकास विभाग व वनविभागाने फळ झाडे वृक्ष लागवड संदर्भात पुढाकार घ्यावा असे आदेशित केले अंतरसिंगजी आर्य व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते एक पेड माॅ के नाम अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.तसेच सदर राष्ट्रीय जनजाती आयोग अध्यक्ष अतंरसिंगजी आर्य व समिती सदस्य यांनी धरणगाव या ठिकाणी क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले.सदर कार्यक्रम प्रसंगी सेंधवा व धरणगाव या दोन शहरात फार जुने ऐतिहासिक संबंध आहेत हे नमूद केले.तसेच जळगाव येथे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ याठिकाणी आदिवासीं विध्यार्थी युवकांशी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रम प्रसंगी लोक संघर्ष मोर्चा अध्यक्ष  प्रतिभाताई शिंदे,डॉ.चंद्रकांत बारेला, सिताराम पटेल सेंंधवा जनपद अध्यक्ष,वैजापूर सरपंच दत्तरसिंग पावरा,मेलाणे सरपंच प्रताप पावरा,देव्हारी सरपंच प्रल्हाद पाडवी,बोरअजंटी सरपंच धरमसिंग बारेला,कर्जाणे सरपंच सतिष बारेला,माजी उपसभापती ताराचंद पावरा, भुषण भिल,प्रमोद बारेला,दयाराम बारेला, ॲड.आरिफा तडवी,मुबारक तडवी, किशोर तडवी,संजयभाऊ शिरसाठ,लुकमान तडवी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते,समाज बांधव व पंचक्रोशीतील गा्मपंचायत  सदस्य,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील कार्यक्रमासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री प्रशांत माहूरे , श्री. पवन पाटील,सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.संदीप पाटील,सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री.जावेद तडवी,वैजापूर वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल श्री.समाधान सोनवणे  आदिनी परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद पाटील यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने