मंडळ अधिकारी रविंद्र माळी यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

 

मंडळ अधिकारी रविंद्र माळी यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव


चोपडा,दि.६(प्रतिनिधी):- हातेड मंडळ अधिकारी रविंद्र भगवान माळी   यांना उत्कृष्ट अधिकारी  पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले आहे.
माळी साम्राज्य व समता विचार फाऊंडेशनमार्फत पाळधी येथेआयोजित  राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्यात  हा पुरस्कार  प्रदान करण्यात आला. यावेळी स्मार्ट उद्योजक, समाजभूषण, आदर्श शिक्षक, उत्कृष्ट अधिकारी, युवा उद्योजक , आदर्श क्रीडा शिक्षक, कृषिभूषण इत्यादी पुरस्कार प्रदान करून मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला.
रविंद्र माळी हे लासुर येथील रहिवासी असून शांत व मितस्वभावी आहेत तसेच ते शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत.त्यांच्या गौरवाप्रित्यर्थ त्यांचेवर लासुर माळी समाजबांधव ,प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व मित्र मंडळींतर्फे  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने