लोकप्रतिनिधी यांनी अधिवेशनात कोळी जमातीचे प्रश्न मांडावेत..तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी

 लोकप्रतिनिधी यांनी अधिवेशनात कोळी जमातीचे प्रश्न मांडावेत..तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी


*चोपडादि.17 (प्रतिनिधी):-* महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जळगांव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांनी आदिवासी कोळी जमातीच्या न्याय व हक्कांसाठी तारांकित प्रश्न व लक्षवेधी सुचना मांडाव्यात, अशी समयसुचक मागणी चोपडा तालुका आदिवासी कोळी जमातीचे संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

       महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि.१९ ते ३० डिसेंबर दरम्यान होत आहे.त्यात राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडुन प्रलंबित व चालु असे ९ हजार ८५७ तारांकित प्रश्न व १ हजार २१७ लक्षवेधी सुचना आल्याचे समजते. ह्या अधिवेशनात अंदाजे २१ विधेयकांवर चर्चाही होऊ शकते. त्यात आदिवासी कोळी जमातीसाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांचेकडुन तारांकित प्रश्न, लक्षवेधी सुचना मांडण्यात येणार आहेत का ? किंवा तसे विधेयक मंजुर होईल का ? राज्यकर्त्यांना कोळी समाजाचा आक्रोश दिसत नाही का ? असाही खडा सवाल सामा.कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी उपस्थित केला आहे.

................................................

*समाजासाठी वाट्टेल ते..आमरण उपोषण हाच पर्याय..*

सरकार हे असो वा ते, दोन्हीही सारखेच आहेत. सर्वांनी कोळ्यांच्या तोंडाला पानेच पुसलेली आहेत. लोकप्रतिनिधी यांना निवडणुकीच्या वेळेसच आमच्या समाजाचा पुळका येतो. आता सभा बैठका मोर्चे मेळावे भरपुर झालेत. समाजाला एका (जातप्रमाणपत्र) कागदाच्या तुकड्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यापुढे कोळ्यांना न्याय मिळत नसेल तर समाजासाठी वाट्टेल ते करण्याची आमची तयारी आहे. प्रथम तीव्र अन्नत्याग (आमरण) उपोषण करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची असेल. संबंधित विभागाने याची नोंद घ्यावी..

*जगन्नाथ बाविस्कर,* तालुकासंपर्कप्रमुख,

आदिवासी टोकरेकोळी जमात, ता.चोपडा.

.................................................

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने