*रावेर नगर पालीका मतदार यादीतील घोळ प्रकरणी इच्छुक उमेदवार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार* : *पद्मादर महाजन*
रावेर दि. 29 जुन(प्रतिनीधी : ईश्वर महाजन)रावेर नगरपालिकेच्या प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार मतदार याद्याच्या घोळा बाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी एक गट सर्वोच्च न्यायालय मध्ये दाद मागण्याच साठी गेला आहे
सदरहून रावेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून जाहीर केलेल्या प्रभाग रचनेच्या आणि प्रारूप मतदार याद्यामध्ये केलेल्या विविध प्रकारे घोळ दिसत असुन त्या घोळाबद्दल उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशानाने नुकतीच प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत परंतु याबाबत जनतेत व इच्छुक उमेदवार यांच्यात अत्यंत नाराजी व संभ्रम निर्माण झाली आहे काही राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्यांच्या फायद्यासाठी चुकीची प्रभाग रचना आणि प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. सदरच्या चुकीच्या प्रभाग रचनेवर मुख्याधिकारी रावेर यांचे कडे हरकती नोंदविल्या होत्या त्यावर म. जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडे सुनावणी होऊन नागरिकांच्या हरकती दि.2जून रोजी म. आयुक्त नाशिक विभाग यांनी फेटाळून लावल्या होत्या त्यानंतर दि.21 जून रोजी नगरपालिका प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत सुद्धा मोठया प्रमाणात घोळ असून बाहेरगावच्या मतदारांची नावे देखिल समाविष्ट करण्यात आली आहे तसेच दुसऱ्या प्रभागातील मतदारांची देखिल नावे समाविष्ट करण्यात आली आहे. याबाबत दि.23 जून रोजी शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्यांनी मुख्याधिकारी यांचे कडे हरकत घेतली होती तसेच नागरिकांनी देखिल मोठया प्रमाणात हरकती घेतलेल्या आहेत.सदर हरकती घेण्याची अंतिम मुदत दि.27 जून होती नागरिकांनी सायंकाळी 6वाजेपर्यंत हरकती घेतल्या परंतु नगरपालिका प्रशासनाने हरकतीची गंभीर दखल न घेता राज्य निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाप्रमाणे प्रभागात प्रत्यक्ष न जाता कोणतेही स्थळ निरीक्षण न करता दि. 28 जून पासून हरकती फेटाळण्याची सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्यामुळे लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मांगणार असल्याचे पत्रकाद्वारे माजी नगराध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन यांनी कळविले आहे.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे याचिका दाखल करणेसाठी एक शिष्टमंडळ आज औरंगाबाद येथे रवाना झाले आहे.