*गारपीटग्रस्त शेतकर्यांना प्रशासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी - सुनील पाटील धाबेकर*
कारंजा ,ता.वाशिम दि.१(प्रतिनिधी अंकुश मुंदे):कारंजा तालुक्यातील 28 डिसेंबर दुपारच्या दरम्यान वादळवायासह.बरसलेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माननीय श्री सुनील पाटील धाबेकर यांनी तहसीलदार तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे अचानक झालेल्या गारपिटीमुळे खरिपातील तूर हरभरा गहू पिकाच्या कांद्याचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच भाजीपाला सुद्धा नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रस्तुत निवेदनातून माननीय सुनिल पाटील धाबेकर यांनी केली या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.