जि.प.सदस्य प्रताप भाऊ पाटील यांनी घेतली तात्काळ दखल..लगेचच पथदिव्याचा उजळ..






जि.प.सदस्य प्रताप भाऊ पाटील  यांनी घेतली तात्काळ दखल..लगेचच पथदिव्याचा उजळ..


पाळधी दि.२०(प्रतिनिधी)

पाळधी गावाच्या प्रवेशद्वारापासून डिव्हायडर वरील सर्व पथदिवे गेल्या एका वर्षांपासून बंद होते. रस्त्यावरील असलेल्या अंधारामुळे ग्रामस्थांना गैरसोय होत होती.

  गावातील ज्येष्ठ पत्रकार यांनी ग्रामस्थांची गैरसोय जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या कडे मांडली असता, प्रताप भाऊंनी त्वरित स्वखर्चाने स्वतः उभे राहून पथदिवे दुरुस्त करून घेतले. आजपासून पाळधी गावातील रस्ते पथदिव्यांमुळे रस्ते उजळून निघणार आहेत. याप्रसंगी माजी सभापती मुकुंद ननावरे, ग्रामपंचायत कर्मचारी शिवाजी पाटील, अमीन पटेल, 

तसेच गावातली नागरिक यासिन शेठ, दानिश पठाण उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने