शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट




 



शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली शरद पवार यांची भेट             

 गणपूर(ता चोपडा)ता 18: महाराष्ट्र राज्य शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन विविध केंद्र व राज्य स्तरीय मागण्यांवर चर्चा केली.यावेळी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.                     शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना शासकीय कृषी विषयक समित्यांवर प्रतिनिधित्व मिळावे, याबाबत शासन निर्णय व्हावा.यामुळे शासकिय योजना चांगल्या पद्धतीने राबविल्या जातील, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविल्या जातील, सुधारणा केल्या जातील.यामुळे शासकिय योजनांचा फायदा चांगल्या प्रकारे शेतकऱ्याना मिळेल.पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना टोल माफी, एस टी बस मोफत प्रवास द्यावा.विधान पररिषदेत राखीव जागा ठेवाव्यात ,बियाणे कायद्यात सुधारणा करुन सर्व बियाणे बिज प्रमाणिकरण यंत्रणेच्या नियंत्रणात तयार करून शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून द्यावे. यासह  प्रधानमंत्री पीकविमा योजना 2014 ला मागील शासन काळात शरद पवार यांनी प्रस्तावित केलेली होती. सरकार बदल झाल्याने योजना लागु केली गेली नाही.उलट यात जोखिम स्तर ८०ते ९०% होता.सरकार बदलल्या नंतर जोखीम स्तर 70 ते 90 टक्के होता.व तो शेतकऱ्यांना फायदेशीर होता.ही माहिती पुराव्यानिशी पिक विमा तज्ञ प्रकाश पाटील यांनी शरद पवारांना दाखविली.व ती माहिती पवारांनी सखोल नोंद घेतली.नविन सरकारने ह्या योजनेला दोन वर्षे स्थगिती दिली व जोखिम स्तर 70,80,90%करण्यात आला. यावेळी शासकिय कृषी पुरस्कार शेतकरी संघाचे राज्याध्यक्ष ऍड प्रकाश पाटील(धुळे),उपाध्यक्ष प्रल्हाद वरे (बारामती),राज्य कार्यकारिणी सदस्य ऍड बाळकृष्ण पाटील(जळगाव) ,मोह संवर्धन मंडळाचे संयोजक  बी जी महाजन(चुंचाळे)           ,कृषी क्रांती हायटेक ऍग्रो प्रोड्युसर कंपनी चे  अध्यक्ष कृष्णा पवार (औरंगाबाद) उपस्थित होते बारामती...खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करतांना ऍड प्रकाश पाटील,प्रल्हाद वरे व मान्यवर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने